Art of live healthy Life....
Sunday, January 26, 2020
Why Recovery Run ?
Strong core muscles
should I run the Marathon?
Thursday, April 5, 2018
कपालभाती प्राणायाम
डॅा• घोसालळकर यांनी कपालभातीबद्दल खूपच चांगली माहिती।
🔔 *कपालभाती प्राणायाम* 🔔
कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो.
कपालभातीने हार्टमधले ब्लोकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् १५ दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता.
कपालभाती करणार्याची हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंशन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली ७० ते ८० टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात.
कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझाॕल्व्ह होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.
कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतो.
कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते.
कपालभाती केल्याने हीमोग्लोबिन एका महिन्यात १२% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात २६ ते १८ पर्यन्त जाते. महिलांच् हीमोग्लोबिन १६ व् पुरुषांच्ं १८ असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.
कपाभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एका महिन्यातच सामान्य होतात.
कपाभातिमुळे थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते. हे कपालभातीमुळे होते.
एवढंच नाही तर, कपालभाती करणारा ५ मिनिटात मनाच्या पलीकडे जातो. गुड़ हार्मोन्स सीक्रेट होऊ लागतात. स्ट्रेस हामोंस गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही.
*किती विशेष आहे पहा.*
कपाभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात. कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला एक एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दूसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट आसण जसा आजार आहे तसं ओव्हरवेट आसण ही आजारच आहे.
कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.
कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.
अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होण. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तूटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुल होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुल होतात व् त्याच रुगलाल स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विद्यानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.
कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् ३ ते ९ महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात.
लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज १०% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडु देत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलि पाहिजे.
विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत.
शेवगा
शेवगा
〰〰
शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते. शेवग्याच्या शेंगा आणि पानांमध्ये सर्व आवश्यक पोषक घटक, ओमेगा आम्ले, खनिजे, रोगप्रतिकारक आणि फायटोकेमिकल संयुगे असतात. शेवग्याच्या शेंगा, पाने, बियांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.
शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते. शेवग्याच्या शेंगा आणि पानांमध्ये सर्व आवश्यक पोषक घटक, ओमेगा आम्ले, खनिजे, रोगप्रतिकारक आणि फायटोकेमिकल संयुगे असतात. शेवग्याच्या शेंगा, पाने, बियांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.
शेवग्याच्या (Moringa oleifera) पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये पोषक घटक असतात. जीवनसत्त्व अ, ब आणि क, खनिजे विशेषतः लोह आणि सल्फर, निथोनाइन आणि सिस्टनाइनसारखी अमिनो आम्ले असतात. त्यात ९० पोषक घटक आणि ४६ प्रकारचे रोगप्रतिकारक घटक असतात. त्यामुळे शेवग्याच्या विविध भागांचा वापर ३०० पेक्षा अधिक आजारांच्या उपचारांमध्ये केला जातो. तसेच त्याच्या वापराचे कोणतेही विपरीत परिणाम शरीरावर दिसून आलेले नाहीत.
विशेषतः आरोग्यपूर्ण हृदयासाठी, रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सामान्य राहण्यासाठी, मुक्त घटकांचे विषारीपण कमी करण्यासाठी शेवग्याचा वापर होतो. दाह कमी करणाऱ्या अवयवांना मदत करतो. तसेच रक्तातील हिमोग्लोबीनचे कमी असलेले प्रमाण वाढवते. प्रतिकारक क्षमतेला साह्य करते.डोळ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी, मेंदूच्या कार्यक्षमता आणि हाडांच्या आरोग्यासाठी शेवगा अत्यंत उपयुक्त आहे.कुपोषण, अशक्तपणा कमी करण्यासाठी, स्ननदा मातांच्या दुधामध्ये वाढ होण्यासाठी, मेनापॉजच्या काळातील नैराश्य यावरही शेवगा उपयुक्त ठरतो.जिवाणूरोधक गुणधर्मामुळे त्वचारोगावरील उपचारात किंवा पाणी शुद्धीकरणासाठी उपयोग होतो.
शेवग्यापासून मूल्यवर्धित पदार्थनिर्मिती
पाने
जगभरात पोषक, पूरक आहारामध्ये शेवगा पानांचा समावेश केला जातो. ही पाने भाजी स्वरूपातही खाल्ली जातात. त्याचप्रमाणे ही पाने वाळवून योग्य वातावरणामध्ये काही महिन्यांपर्यंत साठवता येतात. पाने वाळवून त्याच्या भुकटीचा वापर पूरक, पोषक आहारामध्ये केला जातो. तसेच त्याचा वापर कोणत्याही अन्य भाज्या, पास्ता, ब्रेड यासारख्या खाद्य पदार्थांमध्ये केला जातो.
शेवगा पानांची भुकटी
काढणीनंतर फांद्यावरून पाने वेगळी करावीत. ती स्वच्छ धुऊन सावलीत वाळवावीत. उन्हामध्ये वाळवल्यास त्यातील जीवनसत्त्व अ नष्ट होते. वाळवलेल्या पानांची बारीक पावडर तयार करावी. ती हवाबंद बाटलीमध्ये साठवावी. ही पावडर प्रकाश आणि आर्द्रतेपासून दूर ठेवल्यास सहा महिन्यांपर्यंत चांगली टिकते.
महत्त्वाचे...
जीवनसत्त्व अ टिकवून ठेवण्यासाठी वाळवण्यापूर्वी पाने ब्लांच करून घ्यावीत.
कोणत्याही सूप किंवा सॉसेसमध्ये एक किंवा दोन चमचा शेवगा पावडर मिसळल्यास पोषक घटकांमध्ये वाढ होते.
शेवगा पानांचा रस
ताजी पाने कुस्करून, थोड्याशा पाण्यामध्ये मिसळून मॉर्टरमध्ये टाकावीत. अधिक प्रमाणात रस तयार करण्यासाठी हॅमर मिलचा वापर करावा. ताज्या शेवगा शेंड्यापासूनही (चाळीस दिवसांपेक्षा कमी दिवसांच्या) रस काढता येतो. त्यात थोडेसे पाणी म्हणजेच प्रति १० किलो ताज्या घटकांसाठी एक लिटर पाणी मिसळावे. ते बारीक केल्यानंतर गाळून घ्यावे. त्यात पाणी मिसळून पातळ करावी. चवीप्रमाणे साखर मिसळावी.
एक लिटर पाण्यामध्ये एक किंवा अधिक चमचे शेवगा भुकटी मिसळावी. त्यात चवीप्रमाणे साखर मिसळावी. अधिक काळ साठवण्यासाठी वरील तीव्र द्रावण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावा.
शेवगा पानांचे सॉसेस
दोन कप ताजी पाने एक कप पाण्यामध्ये मिसळून काही मिनिटांसाठी वाफवून घ्यावीत. त्यात बारीक चिरलेला कांदा, मीठ, लोणी आणि अन्य सिझनिंग घटक चवीसाठी मिसळून सॉस तयार करावा.
फुले
शेवग्याच्या फुलांमध्ये कॅल्शिअम आणि पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असतात. त्यांचा वापर शिजवून शेवगा पानांच्या पाककृतीमध्ये किंवा अन्य भाज्यांमध्ये करता येतो. त्याचप्रमाणे वाफवलेल्या फुलांचा वापर सॅलडमध्येही करता येतो.
शेंगा
संपूर्ण कोवळी शेंग ही शिजवून खाता येते किंवा कढीमध्ये वापर केला जातो. जुन्या शेंगांमधील वरील आवरण अधिक टणक होते. त्यातील गर व अपक्व बिया अद्याप खाण्यायोग्य असतात. शेंगा साधारणतः पाच सेंमी आकारापर्यंत कापून, पाण्यामध्ये उकळून घेतल्या जातात. त्यांची डाळीसोबत आमटी करतात. शेंगांतील बिया आणि गर खाल्ला जातो. अत्यंत कोवळ्या (एक सेमीपेक्षा कमी जाडीच्या) शेंगांचा वापर सॅलडनिर्मितीमध्ये होते. ३ सेंमी आकाराचे तुकडे करून, १० मिनिटे वाफवले जातात. त्यानंतर तेल, व्हिनेगर, मीठ, मिरे, लसूण आणि पार्सेली यांच्या मिश्रणामध्ये चांगल्या रीतीने हलवून घेतले जातात.
बिया
शेवग्याच्या बिया पाण्यामध्ये टाकून काही मिनिटांसाठी उकळून घेतात. त्यानंतर त्यावरील पारदर्शक भाग आणि पाणी टाकून देतात. बिया हिरव्या असेपर्यंत खाता येतात; मात्र पिवळ्या रंगाच्या झाल्या की त्या शक्यतो कोणी खात नाहीत. अशा शेवगा बिया चांगल्या रीतीने वाळवून, बारीक भुकटी करून घ्यावी. त्याचा वापर विविध सॉसेसमध्ये सिझनिंगसाठी केला जातो.
शेवगा तेल
बियांवर दाब टाकून त्यापासून तेल मिळवता येते. चांगल्या वाळलेल्या बियांमध्ये तेलाचे प्रमाणे ४२ टक्क्यांपर्यंत असते. या तेलाचा रंग आकर्षक पिवळा असा आहे. हे तेल किंचित चिकट असल्याने अत्यंत नाजूक अशा यंत्रातील (उदा. घड्याळे) घर्षण कमी करण्यासाठी वापरले जाते. शेवगा खाद्य तेलामध्ये मेदांम्लाचे प्रमाणे ०.५ ते ३ टक्क्यांपर्यंत कमी अधिक होते. आयुर्वेदानुसार, हे तेल मेंदू कर्करोग, अँटी पायरेटिक, पोषक घटकांनी परिपूर्ण, जिवाणूरोधक, बुरशीरोधक, दाह कमी करणारे व कोलेस्टेरॉलचे प्राण कमी करणारे असल्याचे सांगितले जाते. दक्षिण आशियाई औषधांमध्ये या तेलाचा वापर होतो.
तेल काढण्याच्या दोन प्रक्रिया असल्या, तरी त्यातील कोल्ड प्रेस ही शेवगा बियांपासून तेल काढण्यासाठी ही सोपी पद्धती मानली जाते. बियांवरील टणक कवच काढण्यासाठी माणसांच्या साह्याने किंवा विद्युत ऊर्जेवर चालणारे यंत्र उपलब्ध आहे. बियांवरील आवरण काढल्यानंतर ताज्या स्थितीमध्ये म्हणजेच त्वरित तेल काढावे. आवरण काढल्यानंतर अधिक काळ गेल्यास काढलेल्या तेलाचा रंग हा गडद होतो.
सुरवातीला काही मिनिटांसाठी यंत्र सुरू करून, त्यानंतर त्यामध्ये आवरण काढलेल्या बिया टाकाव्यात. काही मिनिटांमध्ये बियातून तेल येऊ लागते. दुसऱ्या बाजूने बियांचीपेंड बाहेर येते. शुद्ध कोल्ड प्रेस तेलाचा रंग हा सोनेरी पिवळा असतो.
हे तेल दोन ते तीन दिवसांसाठी स्थिर ठेवावे. त्यातील तरंगते कण खाली बसण्यास मदत होते. याला सेडिमेंटेशन म्हणतात. बॉटलिंग पूर्वी सेडिमेंटेशन न केल्यास त्याती पाण्याचा अंश राहू शकतो. त्यामुळे तेलाची स्थिरता आणि गुणधर्म यावर परिणाम होतो.
एक किलो शेवगा बियापासून ४०० ग्रॅम तेल मिळते, जर बिया तपकिरी होईपर्यंत भाजून घेतल्या, तर त्यातून तेलाचे प्रमाण वाढते.
स्थिर झालेल्या तेल अलगद (खालील थर न हलवता) स्वच्छ भांड्यात काढून घ्यावे. अत्यंत बारीक चाळणीच्या साह्याने गाळून घ्यावे.
सौंदर्य प्रसाधनामध्ये शेवगा तेलाचा वापर
तेलांचा वापर त्वचा रोगासाठी मलम, शरीराच्या मसाजसाठी केला होतो. स्थिरता आणि अन्य तेलांप्रमाणे अधिक काळ ठेवल्यास वास न येण्याचा गुणधर्म यामुळे सुगंधी द्रव्ये उद्योगामध्ये (अत्तरे, केसांसाठी सुगंधी तेलाच्या निर्मितीसाठी) त्याचा वापर होतो.
अन्य पिकांच्या तुलनेमध्ये शेवग्याच्या वाळवलेल्या हिरव्या पानांतील पोषक घटक
शेवगा पानांमध्ये दुधाच्या तुलनेमध्ये कॅल्शिअम १७ पट अधिक असतात.क जीवनसत्त्वाचे प्रमाण संत्र्याच्या तुलनेमध्ये सात पट अधिक असते.केळीच्या तुलनेमध्ये पोटॅशिअमचे प्रमाणे १५ पट अधिक आहे.पालकांच्या तुलनेमध्ये लोहाचे प्रमाण २५ पट अधिक.गाजराच्या तुलनेमध्ये अ जीवनसत्त्वाचे प्रमाण १० पट अधिक.योगर्ट किंवा दह्याच्या तुलनेमध्ये प्रथिनांचे प्रमाण ९ पट अधिक.
दुधी भोपळा
दुधी भोपळा
दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे. एक प्रकारे दुधी भोपळा हे वनस्पतिजन्य दूधच आहे. ‘यथा नाम तथा गुण’ या उक्तीप्रमाणे दुधी भोपळ्याची तुलना ही आईच्या दुधाशी केली आहे. एक शीत गुणाची औषधी गुणधर्म असलेली सौम्य भाजी ही सर्व आजारांमध्ये पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते. लांबट बाटलीच्या आकाराची फिक्या हिरवट रंगाची, आतून पांढऱ्या स्पंजासारखी आणि लांब चौकोनी बियांनी युक्त ही फळभाजी सर्वानाच आरोग्यासाठी उपयुक्त आहे. संस्कृतमध्ये कर्कटी, इंग्रजीमध्ये बॉटल गार्ड, तर शास्त्रीय भाषेत कुकर बीटा मॅक्झिमा या नावाने ओळखला जाणारा दुधी भोपळा कुकर बिटेसी या कुळातील आहे. दुधी भोपळा ही वेल प्रकारातील वनस्पती असून या वनस्पतीची फुले पांढरी असतात.
औषधी गुणधर्म
लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे.
उपयोग
दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे. हृदयविकारामध्ये रक्त वाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल साठून रक्तपुरवठा सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा वेळी रोज सकाळी अर्धा कप दुधी भोपळ्याचा रस, तुळशीची ७-८ पाने, पुदिन्याची ७-८ पाने, संधव, जिरे व काळी मिरी एकत्र करून रोज सकाळी हा रस प्यावा. यामुळे रक्तवाहिन्यांवरील अडथळा दूर होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.
संकलक : प्रमोद तांबे
चिंच : आरोग्यदात्री अम्लिका ....
चिंच : आरोग्यदात्री अम्लिका ....
चिंचेची भलीमोठी झाडे आपल्याकडे भरपूर आढळतात ... चिंचेची सावली अत्यंत शीतल आणि श्रम कमी करणारी असते ....
मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्य पदार्थ आहे ....चिंच अत्यंत रुचीकर असून तिचा वापर थेट औषध म्हणून करता येतो ....
चिंचेचे काही सामान्य उपयोग पाहूया ....
१) चिंचेपासून तयार केलेले "चिंचालवण तेल" पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे ... जेवताना भाताच्या पहिल्या घासाबरोबर हे तेल मिसळून घेतले कि पोटदुखीसारखी दुखणी लवकर बरी होतात ....
२) पिकलेली चिंच वातपित्त आणि कफ अशा तिन्ही दोषांचे शमन करते ...
३) चिंचेचे सरबत उत्तम पित्तशामक आहे ... ज्यांना पित्त वाढून शरीरात उष्णता वाढत चालली आहे असे वाटते त्यांनी एक कप चिंचेचे सरबत उष्णता कमी होई पर्यंत घ्यावे ....
४) तोंडाला चव नसेल तर चिमुटभर मीठ लावून पिकलेली आणि मऊ झालेली चिंच खावी ....
५) हृदयाची ताकद कमी झाली कि पिकून मऊ झालेली काळी चिंच सरबत करून घेतात ... हृदयाच्या स्नायूंना ताकद देण्याचे काम चिंच करते ...
६) मुका मार लागून सूज आली कि चिंचोके ( चिंचेच्या बिया ) वाटून त्याचा लेप करावा ... चिंचेची पाने आणि चिंचेचा गार यांचाही लेप वेदना आणि सूज कमी करणारा आहे ....
७) काविळी मध्ये खाण्यावरची इच्छा मरून गेली कि रुग्णाला पिकलेली चिंच खायला द्यावी ...चिंचेचे सरबत काविळी मध्ये अमृताचे काम करते ...
८) चिंचेच्या फुलांचा ताजा रस नियमित घेतला तर रक्ती मुळव्याध कमी होतो ....
९) पचन शक्ती वाढवून आरोग्यप्राप्ती करून देणारी चिंच खरंच एक स्वस्तातले औषध आहे ....
१० ) चिंचेच्या फुलांचा गुलाबाचा गुलकंद बनवतो तशाच पद्धतीने गुलकंद तयार करावा ....तो उत्तम पित्तशामक आहे ...
चिंचेचे सरबत बनवण्याची कृती :
एक किलो जुनी चिंच घेऊन ती कल्हई केलेल्या भांड्यात बुडेल इतक्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी ..सकाळी भांडे चुलीवर ठेवून एक उकळी येऊ द्यावी .... नंतर मिश्रण गळून त्यात २ किलो साखर घालावी आणि एकतारी पाक होऊ द्यावा ...
सरबत करते वेळी एक ग्लास पाण्यात दोन किंवा तीन चमचे मिश्रण टाकून ढवळून प्यावे .....
अम्लपित्त , उलटी , पोटात जळजळ , मादक पदार्थांची नशा उतरत नसेल तर हे सरबत प्यावे ...