Thursday, April 5, 2018

कपालभाती प्राणायाम

डॅा• घोसालळकर यांनी कपालभातीबद्दल खूपच चांगली माहिती।         

    🔔         *कपालभाती प्राणायाम*        🔔

कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो.

कपालभातीने हार्टमधले ब्लोकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् १५ दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता.

कपालभाती करणार्याची हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंशन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली ७० ते ८० टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात.
    
कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझाॕल्व्ह होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.

कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतो.
   
कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते.

कपालभाती केल्याने हीमोग्लोबिन एका महिन्यात १२% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात २६ ते १८ पर्यन्त जाते. महिलांच् हीमोग्लोबिन १६ व् पुरुषांच्ं १८ असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.


कपाभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एका महिन्यातच सामान्य होतात.


कपाभातिमुळे थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते.  हे कपालभातीमुळे होते.

एवढंच नाही तर, कपालभाती करणारा ५ मिनिटात मनाच्या पलीकडे जातो. गुड़ हार्मोन्स सीक्रेट होऊ लागतात. स्ट्रेस हामोंस गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही.

*किती विशेष आहे पहा.*

कपाभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात. कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला एक एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दूसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट आसण जसा आजार आहे तसं ओव्हरवेट आसण ही आजारच आहे.
    
कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.

कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.

अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होण. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तूटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुल होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुल होतात व् त्याच रुगलाल स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विद्यानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.

कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् ३ ते ९ महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात.

लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज १०% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडु देत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलि पाहिजे.

विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत.

शेवगा

शेवगा
〰〰

शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते. शेवग्याच्या शेंगा आणि पानांमध्ये सर्व आवश्‍यक पोषक घटक, ओमेगा आम्ले, खनिजे, रोगप्रतिकारक आणि फायटोकेमिकल संयुगे असतात. शेवग्याच्या शेंगा, पाने, बियांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.

शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते. शेवग्याच्या शेंगा आणि पानांमध्ये सर्व आवश्‍यक पोषक घटक, ओमेगा आम्ले, खनिजे, रोगप्रतिकारक आणि फायटोकेमिकल संयुगे असतात. शेवग्याच्या शेंगा, पाने, बियांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.

शेवग्याच्या (Moringa oleifera) पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये पोषक घटक असतात. जीवनसत्त्व अ, ब आणि क, खनिजे विशेषतः लोह आणि सल्फर, निथोनाइन आणि सिस्टनाइनसारखी अमिनो आम्ले असतात. त्यात ९० पोषक घटक आणि ४६ प्रकारचे रोगप्रतिकारक घटक असतात. त्यामुळे शेवग्याच्या विविध भागांचा वापर ३०० पेक्षा अधिक आजारांच्या उपचारांमध्ये केला जातो. तसेच त्याच्या वापराचे कोणतेही विपरीत परिणाम शरीरावर दिसून आलेले नाहीत.

विशेषतः आरोग्यपूर्ण हृदयासाठी, रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सामान्य राहण्यासाठी, मुक्त घटकांचे विषारीपण कमी करण्यासाठी शेवग्याचा वापर होतो. दाह कमी करणाऱ्या अवयवांना मदत करतो. तसेच रक्तातील हिमोग्लोबीनचे कमी असलेले प्रमाण वाढवते. प्रतिकारक क्षमतेला साह्य करते.डोळ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी, मेंदूच्या कार्यक्षमता आणि हाडांच्या आरोग्यासाठी शेवगा अत्यंत उपयुक्त आहे.कुपोषण, अशक्तपणा कमी करण्यासाठी, स्ननदा मातांच्या दुधामध्ये वाढ होण्यासाठी, मेनापॉजच्या काळातील नैराश्‍य यावरही शेवगा उपयुक्त ठरतो.जिवाणूरोधक गुणधर्मामुळे त्वचारोगावरील उपचारात किंवा पाणी शुद्धीकरणासाठी उपयोग होतो.

शेवग्यापासून मूल्यवर्धित पदार्थनिर्मिती
पाने
जगभरात पोषक, पूरक आहारामध्ये शेवगा पानांचा समावेश केला जातो. ही पाने भाजी स्वरूपातही खाल्ली जातात. त्याचप्रमाणे ही पाने वाळवून योग्य वातावरणामध्ये काही महिन्यांपर्यंत साठवता येतात. पाने वाळवून त्याच्या भुकटीचा वापर पूरक, पोषक आहारामध्ये केला जातो. तसेच त्याचा वापर कोणत्याही अन्य भाज्या, पास्ता, ब्रेड यासारख्या खाद्य पदार्थांमध्ये केला जातो.  

शेवगा पानांची भुकटी
काढणीनंतर फांद्यावरून पाने वेगळी करावीत. ती स्वच्छ धुऊन सावलीत वाळवावीत. उन्हामध्ये वाळवल्यास त्यातील जीवनसत्त्व अ नष्ट होते. वाळवलेल्या पानांची बारीक पावडर तयार करावी. ती हवाबंद बाटलीमध्ये साठवावी. ही पावडर प्रकाश आणि आर्द्रतेपासून दूर ठेवल्यास सहा महिन्यांपर्यंत चांगली टिकते.

महत्त्वाचे...
जीवनसत्त्व अ टिकवून ठेवण्यासाठी वाळवण्यापूर्वी पाने ब्लांच करून घ्यावीत.
कोणत्याही सूप किंवा सॉसेसमध्ये एक किंवा दोन चमचा शेवगा पावडर मिसळल्यास पोषक घटकांमध्ये वाढ होते.

शेवगा पानांचा रस
ताजी पाने कुस्करून, थोड्याशा पाण्यामध्ये मिसळून मॉर्टरमध्ये टाकावीत. अधिक प्रमाणात रस तयार करण्यासाठी हॅमर मिलचा वापर करावा. ताज्या शेवगा शेंड्यापासूनही (चाळीस दिवसांपेक्षा कमी दिवसांच्या) रस काढता येतो. त्यात थोडेसे पाणी म्हणजेच प्रति १० किलो ताज्या घटकांसाठी एक लिटर पाणी मिसळावे. ते बारीक केल्यानंतर गाळून घ्यावे. त्यात पाणी मिसळून पातळ करावी. चवीप्रमाणे साखर मिसळावी.  
एक लिटर पाण्यामध्ये एक किंवा अधिक चमचे शेवगा भुकटी मिसळावी. त्यात चवीप्रमाणे साखर मिसळावी. अधिक काळ साठवण्यासाठी वरील तीव्र द्रावण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावा.  
 
शेवगा पानांचे सॉसेस
दोन कप ताजी पाने एक कप पाण्यामध्ये मिसळून काही मिनिटांसाठी वाफवून घ्यावीत. त्यात बारीक चिरलेला कांदा, मीठ, लोणी आणि अन्य सिझनिंग घटक चवीसाठी मिसळून सॉस तयार करावा.

फुले
शेवग्याच्या फुलांमध्ये कॅल्शिअम आणि पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असतात. त्यांचा वापर शिजवून शेवगा पानांच्या पाककृतीमध्ये किंवा अन्य भाज्यांमध्ये करता येतो. त्याचप्रमाणे वाफवलेल्या फुलांचा वापर सॅलडमध्येही करता येतो.

शेंगा
संपूर्ण कोवळी शेंग ही शिजवून खाता येते किंवा कढीमध्ये वापर केला जातो. जुन्या शेंगांमधील वरील आवरण अधिक टणक होते. त्यातील गर व अपक्व बिया अद्याप खाण्यायोग्य असतात. शेंगा साधारणतः पाच सेंमी आकारापर्यंत कापून, पाण्यामध्ये उकळून घेतल्या जातात. त्यांची डाळीसोबत आमटी करतात. शेंगांतील बिया आणि गर खाल्ला जातो. अत्यंत कोवळ्या (एक सेमीपेक्षा कमी जाडीच्या) शेंगांचा वापर सॅलडनिर्मितीमध्ये होते. ३ सेंमी आकाराचे तुकडे करून, १० मिनिटे वाफवले जातात. त्यानंतर तेल, व्हिनेगर, मीठ, मिरे, लसूण आणि पार्सेली यांच्या मिश्रणामध्ये चांगल्या रीतीने हलवून घेतले जातात.

बिया
शेवग्याच्या बिया पाण्यामध्ये टाकून काही मिनिटांसाठी उकळून घेतात. त्यानंतर त्यावरील पारदर्शक भाग आणि पाणी टाकून देतात. बिया हिरव्या असेपर्यंत खाता येतात; मात्र पिवळ्या रंगाच्या झाल्या की त्या शक्‍यतो कोणी खात नाहीत. अशा शेवगा बिया चांगल्या रीतीने वाळवून, बारीक भुकटी करून घ्यावी. त्याचा वापर विविध सॉसेसमध्ये सिझनिंगसाठी केला जातो.

शेवगा तेल
बियांवर दाब टाकून त्यापासून तेल मिळवता येते. चांगल्या वाळलेल्या बियांमध्ये तेलाचे प्रमाणे ४२ टक्‍क्‍यांपर्यंत असते. या तेलाचा रंग आकर्षक पिवळा असा आहे. हे तेल किंचित चिकट असल्याने अत्यंत नाजूक अशा यंत्रातील (उदा. घड्याळे) घर्षण कमी करण्यासाठी वापरले जाते. शेवगा खाद्य तेलामध्ये मेदांम्लाचे प्रमाणे ०.५ ते ३ टक्‍क्‍यांपर्यंत कमी अधिक होते. आयुर्वेदानुसार, हे तेल मेंदू कर्करोग, अँटी पायरेटिक, पोषक घटकांनी परिपूर्ण, जिवाणूरोधक, बुरशीरोधक, दाह कमी करणारे व कोलेस्टेरॉलचे प्राण कमी करणारे असल्याचे सांगितले जाते. दक्षिण आशियाई औषधांमध्ये या तेलाचा वापर होतो.

तेल काढण्याच्या दोन प्रक्रिया असल्या, तरी त्यातील कोल्ड प्रेस ही शेवगा बियांपासून तेल काढण्यासाठी ही सोपी पद्धती मानली जाते. बियांवरील टणक कवच काढण्यासाठी माणसांच्या साह्याने किंवा विद्युत ऊर्जेवर चालणारे यंत्र उपलब्ध आहे. बियांवरील आवरण काढल्यानंतर ताज्या स्थितीमध्ये म्हणजेच त्वरित तेल काढावे. आवरण काढल्यानंतर अधिक काळ गेल्यास काढलेल्या तेलाचा रंग हा गडद होतो.

सुरवातीला काही मिनिटांसाठी यंत्र सुरू करून, त्यानंतर त्यामध्ये आवरण काढलेल्या बिया टाकाव्यात. काही मिनिटांमध्ये बियातून तेल येऊ लागते. दुसऱ्या बाजूने बियांचीपेंड बाहेर येते. शुद्ध कोल्ड प्रेस तेलाचा रंग हा सोनेरी पिवळा असतो.

हे तेल दोन ते तीन दिवसांसाठी स्थिर ठेवावे. त्यातील तरंगते कण खाली बसण्यास मदत होते. याला सेडिमेंटेशन म्हणतात. बॉटलिंग पूर्वी सेडिमेंटेशन न केल्यास त्याती पाण्याचा अंश राहू शकतो. त्यामुळे तेलाची स्थिरता आणि गुणधर्म यावर परिणाम होतो.
एक किलो शेवगा बियापासून ४०० ग्रॅम तेल मिळते, जर बिया तपकिरी होईपर्यंत भाजून घेतल्या, तर त्यातून तेलाचे प्रमाण वाढते.

स्थिर झालेल्या तेल अलगद (खालील थर न हलवता) स्वच्छ भांड्यात काढून घ्यावे. अत्यंत बारीक चाळणीच्या साह्याने गाळून घ्यावे.

सौंदर्य प्रसाधनामध्ये शेवगा तेलाचा वापर
तेलांचा वापर त्वचा रोगासाठी मलम, शरीराच्या मसाजसाठी केला होतो. स्थिरता आणि अन्य तेलांप्रमाणे अधिक काळ ठेवल्यास वास न येण्याचा गुणधर्म यामुळे सुगंधी द्रव्ये उद्योगामध्ये (अत्तरे, केसांसाठी सुगंधी तेलाच्या निर्मितीसाठी) त्याचा वापर होतो.

अन्य पिकांच्या तुलनेमध्ये शेवग्याच्या वाळवलेल्या हिरव्या पानांतील पोषक घटक

शेवगा पानांमध्ये दुधाच्या तुलनेमध्ये कॅल्शिअम १७ पट अधिक असतात.क जीवनसत्त्वाचे प्रमाण संत्र्याच्या तुलनेमध्ये सात पट अधिक असते.केळीच्या तुलनेमध्ये पोटॅशिअमचे प्रमाणे १५ पट अधिक आहे.पालकांच्या तुलनेमध्ये लोहाचे प्रमाण २५ पट अधिक.गाजराच्या तुलनेमध्ये अ जीवनसत्त्वाचे प्रमाण १० पट अधिक.योगर्ट किंवा दह्याच्या तुलनेमध्ये प्रथिनांचे प्रमाण ९ पट अधिक.

दुधी भोपळा

दुधी भोपळा

दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे. एक प्रकारे दुधी भोपळा हे वनस्पतिजन्य दूधच आहे. ‘यथा नाम तथा गुण’ या उक्तीप्रमाणे दुधी भोपळ्याची तुलना ही आईच्या दुधाशी केली आहे. एक शीत गुणाची औषधी गुणधर्म असलेली सौम्य भाजी ही सर्व आजारांमध्ये पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते. लांबट बाटलीच्या आकाराची फिक्या हिरवट रंगाची, आतून पांढऱ्या स्पंजासारखी आणि लांब चौकोनी बियांनी युक्त ही फळभाजी सर्वानाच आरोग्यासाठी उपयुक्त आहे. संस्कृतमध्ये कर्कटी, इंग्रजीमध्ये बॉटल गार्ड, तर शास्त्रीय भाषेत कुकर बीटा मॅक्झिमा या नावाने ओळखला जाणारा दुधी भोपळा कुकर बिटेसी या कुळातील आहे. दुधी भोपळा ही वेल प्रकारातील वनस्पती असून या वनस्पतीची फुले पांढरी असतात.
औषधी गुणधर्म
लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे.
उपयोग
दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे. हृदयविकारामध्ये रक्त वाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल साठून रक्तपुरवठा सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा वेळी रोज सकाळी अर्धा कप दुधी भोपळ्याचा रस, तुळशीची ७-८ पाने, पुदिन्याची ७-८ पाने, संधव, जिरे व काळी मिरी एकत्र करून रोज सकाळी हा रस प्यावा. यामुळे रक्तवाहिन्यांवरील अडथळा दूर होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.

संकलक : प्रमोद तांबे

चिंच : आरोग्यदात्री अम्लिका ....

चिंच : आरोग्यदात्री अम्लिका ....

चिंचेची भलीमोठी झाडे आपल्याकडे भरपूर आढळतात ... चिंचेची सावली अत्यंत शीतल आणि श्रम कमी करणारी असते ....

मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्य पदार्थ आहे ....चिंच अत्यंत रुचीकर असून तिचा वापर थेट औषध म्हणून करता येतो ....

चिंचेचे काही सामान्य उपयोग पाहूया ....
१) चिंचेपासून तयार केलेले "चिंचालवण तेल" पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे ... जेवताना भाताच्या पहिल्या घासाबरोबर हे तेल मिसळून घेतले कि पोटदुखीसारखी दुखणी लवकर बरी होतात ....

२) पिकलेली चिंच वातपित्त आणि कफ अशा तिन्ही दोषांचे शमन करते ...

३) चिंचेचे सरबत उत्तम पित्तशामक आहे ... ज्यांना पित्त वाढून शरीरात उष्णता वाढत चालली आहे असे वाटते त्यांनी एक कप चिंचेचे सरबत उष्णता कमी होई पर्यंत घ्यावे ....

४) तोंडाला चव नसेल तर चिमुटभर मीठ लावून पिकलेली आणि मऊ झालेली चिंच खावी ....

५) हृदयाची ताकद कमी झाली कि पिकून मऊ झालेली काळी चिंच सरबत करून घेतात ... हृदयाच्या स्नायूंना ताकद देण्याचे काम चिंच करते ...

६) मुका मार लागून सूज आली कि चिंचोके ( चिंचेच्या बिया ) वाटून त्याचा लेप करावा ... चिंचेची पाने आणि चिंचेचा गार यांचाही लेप वेदना आणि सूज कमी करणारा आहे ....

७) काविळी मध्ये खाण्यावरची इच्छा मरून गेली कि रुग्णाला पिकलेली चिंच खायला द्यावी ...चिंचेचे सरबत काविळी मध्ये अमृताचे काम करते ...

८) चिंचेच्या फुलांचा ताजा रस नियमित घेतला तर रक्ती मुळव्याध कमी होतो ....

९) पचन शक्ती वाढवून आरोग्यप्राप्ती करून देणारी चिंच खरंच एक स्वस्तातले औषध आहे ....

१० ) चिंचेच्या फुलांचा गुलाबाचा गुलकंद बनवतो तशाच पद्धतीने गुलकंद तयार करावा ....तो उत्तम पित्तशामक आहे ...

चिंचेचे सरबत बनवण्याची कृती :
एक किलो जुनी चिंच घेऊन ती कल्हई केलेल्या भांड्यात बुडेल इतक्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी ..सकाळी भांडे चुलीवर ठेवून एक उकळी येऊ द्यावी .... नंतर मिश्रण गळून त्यात २ किलो साखर घालावी आणि एकतारी पाक होऊ द्यावा ...

सरबत करते वेळी एक ग्लास पाण्यात दोन किंवा तीन चमचे मिश्रण टाकून ढवळून प्यावे .....

अम्लपित्त , उलटी , पोटात जळजळ , मादक पदार्थांची नशा उतरत नसेल तर हे सरबत प्यावे ...

प्राणायम करण्याचे फायदे...

Article from loksatta

प्राणायम करण्याचे फायदे.

१. २० मिनिटे केलेला प्राणायाम १ तास केलेल्या व्यायामाइतका फायद्याचा असतो.

२. प्राणायामामुळे श्वसनाला एकप्रकारची लय येते आणि त्याचा शरीरासाठी फायदा
होतो.

३. प्राणायामामध्ये डावी नाकपुडी (चंद्रनाडी) आणि उजवी नाकपुडी (सूर्यनाडी)
यांच्यामार्फत श्वसनक्रिया संतुलित होऊन आयुर्मान वाढते.

४. शरीरातील प्रत्येक मांसपेशीपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि शरीरातील
कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी होते.

५. एकाग्रता वाढण्यास मदत होते.

६. पचनक्रिया सुधारते, त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

७. हॉर्मोन्सच्या कार्यात समतोल राहतो आणि ग्रंथी सक्रीय होतात.

८. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, त्यामुळे सर्दी, खोकला आणि अस्थमाचे प्रमाण
कमी होते.

९. मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, पॅरालिसिस, वजन कमी/ जास्त करणे यामध्ये
प्राणायामाचा फायदा होतो.

१०. नियमीत प्राणायाम करण्याने मन प्रसन्न, उत्साही राहते. मनावर ताबा मिळवता
आल्याने कोणत्याही कठिण परिस्थितीत योग्य ते निर्णय घेता येतात.

टीप – प्राणायामाचे अनेक फायदे होत असले तरीही ते शास्त्रशुद्ध पद्धतीने,
तज्ज्ञांकडून योग्य ते प्रशिक्षण घेऊन मगच करावे. व्यक्तीनुसार ते कोणी, कधी
आणि किती प्रमाणात करायचे हे बदलणारे असते. मनाली मगर-कदम, फिटनेसतज्ज्ञ

MEDICAL FITNESS____

👍*MEDICAL FITNESS*💐

*PREVENTION IS* *BETTER THAN CURE*

____MEDICAL FITNESS____

       *BLOOD PRESSURE*

120/80 --  Normal
130/85 --  Normal  (Control)
140/90 --  High
150/95 --  V.High

                *PULSE*
         
72      per minute (standard)
60 --  80 p.m.        (Normal)
40 --  180  p.m.     (abnormal)

        *TEMPERATURE*
        
98.4 F     Normal
99.0 F     Above  (Fever)

          *BLOOD GROUP*                 
          *COMPATIBILITY*

What’s Your Type
and how common is it?

*O+*       1 in 3        37.4%
(Most common)

*A+*        1 in 3        35.7%

*B+*        1 in 12        8.5%

*AB+*     1 in 29        3.4%

*O-*        1 in 15        6.6%

*A-*        1 in 16        6.3%

*B-*        1 in 67        1.5%

*AB-*     1 in 167        .6%
(Rarest)

*Compatible Blood Types*

O- can receive *O-*

O+ can receive *O+, O-*

A- can receive *A-, O-*

A+ can receive *A+, A-, O+, O-*

B- can receive *B-, O-*

B+ can receive *B+, B-, O+, O-*

AB- can receive *AB-, B-, A-, O-*

AB+ can receive *AB+, AB-, B+, B-, A+,  A-,  O+,  O-*

This is an important msg which can save a life! A life could be saved...
What is your blood group ?
Share the fantastic information..

       *EFFECT OF WATER*                 
     We Know - Water is
important but never tried to know about the SPECIAL TIMES one has to drink it.. !!!

          *DO YOU KNOW ?*

  Drinking 1 Glass of Water at the Right Time Maximizes its effectiveness on the  Human Body;

         *1 Glass of Water*
  after waking up - helps to
  activate internal  organs..

         *1 Glass of Water*
   30 Minutes  before a Meal -
              helps digestion..

        *1 Glass of Water*
   before taking a Bath  - helps
   lower your blood pressure.

        *1 Glass of Water*.
   before going to Bed -  avoids
   STROKE or Heart  Attack.

*👍When someone shares something of value with you and you benefit from  it,💐*

    *🙏🏽You have a moral*   
        *obligation to share*
Please forward to CONTACTS
❣❣❣🙏🏽🙏🏽🙏🏽❣❣❣

औषधाविना उपचार : पालेभाज्या खा, पण…!

औषधाविना उपचार : पालेभाज्या खा, पण…!

पालेभाज्या खा असे मुलांच्या कानीकपाळी ओरडून सांगितले जात असते. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आहारात पालेभाज्यांचे स्थान मर्यादित आहे. म्हणूनच पालेभाज्या खाताना विशेष काळजीही घ्यायला हवी.

सर्व खाद्यपदार्थात पाने, फुले, फळे, कांड, कंद हे क्रमाक्रमाने अधिक बलवान आहेत. अधिक सुशिक्षित मंडळी आधुनिक आहारशास्त्र वाचून आपल्या मुलाबाळांकरिता पालेभाजी खाण्याचा आग्रह करीत असतात. तो आग्रह अतिशयोक्तीचा नसावा. धान्ये, कडधान्ये, फळे, दूध, मीठ, मांस, फळभाज्या, तोंडलावणी या अनेक प्रकारच्या अन्नपदार्थाचे प्रत्येकाचे काही खास वैशिष्टय़ आहे.
नुसती भाजी किंवा पोळी किंवा भाकरी खाऊन पोट भरेल; पण नुसत्या पालेभाज्या खाऊन किंवा त्यांचा रस पिऊन पोट भरणार नाही. पालेभाज्यांचे आहारात मर्यादित काम आहे. त्याकरिता त्या मर्यादा आपण समजावून घेणे आवश्यक आहे.
पालेभाज्या या अल्पायू आहेत. त्यांची वाढ दहा-पंधरा दिवसांत किंवा जास्तीत जास्त तीन आठवडय़ांत होते. या काळात त्यांनी जमीन, पाणी किंवा वातावरणातून घेतलेला जीवनरस हा असाच अल्पायू, कमी आयुष्य देणारा असतो. धान्ये, फळे, कंद यांच्यामध्ये त्या त्या द्रव्यांचा परिपोष झालेला असतो. तसे पालेभाजीत नाही. पालेभाजी शरीराला स्थैर्य देऊ शकत नाही. तरीपण जेव्हा विविध डॉक्टर मंडळी कॅल्शिअमच्या कमतरतेकरिता, कॅल्शियम गोळय़ा घ्यायला सांगतात, तेव्हा त्यांना पर्याय म्हणून पालेभाज्यांचा वापर करून शरीरात कॅल्शिअमची अपेक्षित वाढ होते का हे जरूर पाहावे.
पालेभाज्यांतील दुसरा दोष म्हणजे त्यांची उंची लहान असते. त्यामुळे त्यांचा जमिनीतील मातीशी जास्त संपर्क येतो. पालेभाजीच्या पानांमध्ये हजारो बारीक बारीक अतिसूक्ष्म जंतू असण्याची शक्यता असते. आपण मेथी, कोथिंबीर, चुका, चाकवत यांची गड्डी आणतो, धुतो, चिरावयास घेतो. स्वयंपाक करणारी मंडळी कटाक्षाने प्रत्येक पान न पान स्वच्छ धुऊन भाजी करीत असतील का? त्यामुळे खराब पाणी पिऊन ज्यांना कृमी, जंत, आमांश, पोटदुखी, जुलाब, उलटय़ा, उदरवात हे विकार नेहमी नेहमी होत असतात, त्यांनी पालेभाज्या काळजीपूर्वक निवडून स्वच्छ करूनच खाव्यात. पोटाची तक्रार असणाऱ्यांनी पालेभाजी टाळलेली बरी. खायचीच असेल तर त्यासोबत आले, लसूण, जिरे, मिरी, सुंठ, हिंग, मोहरी यांचा वापर असावा.
पालेभाज्यांतील आणखी एक दोष म्हणजे लघवी कमी होणे. लघवीची आग होणे, लघवी कोंडणे या तक्रारी असणाऱ्यांनी पालेभाज्या खाऊ नयेत. पालेभाज्यांत एक प्रकारचे क्षार असतात. चाळिशीच्या वर वय झालेल्या व्यक्तींना लघवीचा त्रास असला तर लघवीवाटे हे क्षार बाहेर टाकणे अवघड असते.
आयुर्वेदात फार प्राचीन कालापासून पथ्यकर व कुपथ्यकारक असे आहारपदार्थाचे केलेले वर्गीकरण ग्रंथात आढळते. या वर्णनात सांगितलेल्या काही वनस्पती आता मिळत नाहीत. कालौघात काही वनस्पती नाहीशा झाल्या. यातही बदल झाला असेल. पुणे-मुंबई व कोकण किंवा देशातील लहानमोठय़ा शहरांत भिन्न-भिन्न प्रकारच्या पालेभाज्यांचे खूपच प्रकार आढळतात. आताच्या संदर्भात सर्वत्र सहज मिळणाऱ्या पालेभाज्यांचा विचार आपण करीत आहोत.
वासनवेल (पाठा) कचोरा, कुरडू, विष्णुक्रांता, चाकवत, दुधी या भाज्या पथ्यकर, पचायला हलक्या व त्रिदोषहारक आहेत. कुरडूची भाजी दुबळेपणा दूर करते. चाकवत सारक आहे. पडवळ, शिकेकाई, कडुनिंब, सागरगोटा, बावची, गुळवेल, वेताची पाने, रिंगणी, डोरली, अडुळसा, ब्राह्मी, रानतीळ, करटोली, कारले, पित्तपापडा, वांगे, पुनर्नवा, दोडका या सर्वाची पाने मलावष्टंभ, वातूळ, पित्त कमी करणारी, थंड, चवीने कडू व वजन घटविणारी आहेत. आयुर्वेदात जिवंती ही सर्वश्रेष्ठ तर मोहरी सर्वात कनिष्ठ पालेभाजी मानली आहे.
अळू
अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे रक्त वाढवणारी, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी. भाजीकरिता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा. अळूच्या पानांचा रस व जिरेपूड असे मिश्रण पित्तावर उत्तम गुण देते. फुरसे किंवा अन्य विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चौथा थापावा व पोटात रस घ्यावा. गळवे किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठे वाटून त्या जागी बांधावी. गळू फुटतात.
अंबाडी
अंबाडी ही पालेभाजी रुचकर आहे; पण डोळय़ाचे विकार, त्वचारोग, रक्ताचे विकार असणाऱ्यांनी वापरू नये. अंबाडी खूप उष्ण आहे, तशीच ती फाजील कफही वाढवते.
करडई
करडई पालेभाजी खूप उष्ण आहे. चरबी वाढू नये म्हणून याच्या तेलाचा उपयोग होतो. तसेच याची पालेभाजी वजन वाढू देत नाही. कफ प्रकृतीच्या लठ्ठ व्यक्तींना करडईची भाजी फार उपयुक्त आहे. या पालेभाज्यांच्या रसाने एक वेळ लघवी साफ होते. मात्र डोळय़ाच्या व त्वचेच्या विकारात करडई वापरू नये. करडईच्या बियांच्या तेलाची प्रसिद्धी सफोला या ब्रॅण्डनावामुळे झाली आहे. त्यात तुलनेने उष्मांक कमी असतात.
कुरडू
कुरडूच्या बिया मूतखडा विकारात उपयुक्त आहेत. कुरडूची पालेभाजीसुद्धा लघवी साफ करायला उपयोगी आहे. या पालेभाजीमुळे कफ कमी होतो. जुनाट विकारात कुरडूच्या पालेभाजीचा रस प्यावा. कोवळय़ा पानांचा रस किंवा जून पाने शिजवून त्याची भाजी खावी. दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफविकार यात उपयुक्त आहे.
कोथिंबीर
कोथिंबीर भाजी का तोंडी लावणे हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवू या. कोथिंबिरीचा जास्त करून वापर खाद्यपदार्थाची चव वाढवायला म्हणून प्रामुख्याने केला जातो. चटणी, कोशिंबीर, खिचडी, पुलाव, भात, विविध भाज्या, आमटी, सूप या सर्वाकरिता कोथिंबीर हवीच. बहुधा सर्व घरी, सदासर्वदा, सकाळ-संध्याकाळ पोळी, भाकरी, भात सोडून सगळय़ा पदार्थात कोथिंबीर वापरली जातेच. कोथिंबीर ताजीच हवी तरच त्याचा स्वाद पदार्थाची खुमारी वाढवतो. भाजीबाजारात काही वेळा कोथिंबीर खूप स्वस्त, तर उन्हाळय़ात सर्वसामान्य माणसाच्या आटोक्याच्या बाहेर असते. कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रुची टिकवणारी आहे. जेवणात अधिक तिखट जळजळीत पदार्थ खाणाऱ्यांना उष्णता, पित्त याचा त्रास होऊ नये याची काळजी कोथिंबीर घेते. जेव्हा विविध स्ट्राँग औषधांची रिअॅऱक्शन येते, अंगावर पित्त, खाज किंवा गळवांचा त्रास होतो त्या वेळेस कोथिंबीर स्वच्छ धुऊन वाटावी, त्याचा रस पोटात घ्यावा, चोथा त्वचेला बाहेरून लावावा. बिब्बा, गंधकमुक्त औषधे, स्ट्राँग गुग्गुळ कल्प यांच्या वापरामुळे काही उपद्रव उद्भवल्यास कोथिंबिरीचा सहारा घ्यावा. रक्तशुद्धी, रक्तातील उष्णता कमी करणे, तापातील शोष हा उपद्रव कमी करायला ताज्या कोथिंबिरीच्या रसाचा वापर करावा. पथ्यकर भाज्यांत कोथिंबिर अग्रस्थानी आहे.
घोळ
घोळाची भाजी बुळबुळीत असली तरी औषधी गुणाची आहे. त्यात एक क्षार आहे. चवीने ओशट असलेली घोळाची भाजी थंड गुणाची असून अन्नपचनास मदत करते, यकृताचे कार्य सुधारते. रक्ती, मूळव्याध, दातातून रक्त येणे, सूज, अंगाचा दाह, मूत्रपिंड व बस्तीच्या विकारात उपयुक्त आहे. विसर्प किंवा धावरे, नागीण विकारात पाने वाटून त्यांचा लेप लावावा.
चाकवत
चाकवत ही पालेभाजी देशभर सर्वत्र सदासर्वदा मिळते. पालेभाज्यांत आयुर्वेद संहिताकार जिवंती श्रेष्ठ मानतात; पण ही वनस्पती संदिग्ध व वादग्रस्त आहे. व्यवहार पाहता चाकवताला श्रेष्ठत्व द्यावे. ज्वर, अग्निमांद्य किंवा दीर्घकाळच्या तापामुळे तोंडाला चव नसणे, कावीळ, छातीत जळजळ अशा नाना तक्रारींत ही भाजी वापरावी. शक्यतो किमान मसालेदार पदार्थाबरोबर ही पातळ पालेभाजी तयार करावी. व्यक्तिनुरूप व प्रकृतीप्रमाणे लसूण, आले, जिरे, धने, हिंग, ताक, सैंधव, मिरी, तूप, खडीसाखर, गूळ हे पदार्थ अनुपान म्हणून वापरावे. आंबट नसलेल्या ताकातील चाकवताची पालेभाजी हा उत्तम पदार्थ होय. शक्यतो पालेभाज्यांचे ज्यूस घेऊ नयेत.
चुका
बाराही महिने मिळणारी चुक्याची भाजी जास्त करून श्राद्धाकरिता अळूच्या भाजीबरोबरच वापरली जाते. नावाप्रमाणे चुक्याची चव आंबट आहे. पाने छोटी व त्याचे देठ पातळ भाजीकरिता वापरतात. चुका उष्ण, पाचक व वातानुलोमन करणारा आहे. त्याचबरोबर त्याच्या संग्राहक गुणामुळे चुक्रसिद्ध तेलाची पट्टी योनीभ्रंश, अंग बाहेर येणे याकरिता वापरली जाते. पचायला कठीण असणाऱ्या पदार्थाबरोबर चुक्याची पाने वापरावी.
तांदुळजा
तांदुळजा लाल, हिरवा कुठेही केव्हाही सहज येतो. ज्यांना शरीरात सी जीवनसत्त्व हवे आहे त्यांनी तांदुळजाची भाजी खावी. ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शीतवीर्य आहे. उष्णतेच्या तापात विशेषत: गोवर, कांजिण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे. विषविकार, नेत्रविकार, पित्तविकार, मूळव्याध, यकृत व पांथरी वाढणे या विकारांत पथ्यकर म्हणून जरूर वापरावी. उपदंश, महारोग, त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे. नाजूक प्रकृतीच्या व्यक्तीकरिता, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी तांदुळजा वरदान आहे. डोळय़ाच्या विकारात आग होणे, कंड सुटणे, पाणी येणे, डोळे चिकटणे या तक्रारींत तांदुळजाची भाजी खावी. डोळे तेजस्वी होतात. जुनाट मलावरोध विकारात आतडय़ांना चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला तांदुळजाची भाजी उपयुक्त आहे. तांदुळजाची पातळ भाजी वृद्ध माणसांच्या आरोग्याकरिता जास्त उपयुक्त आहे. मोठय़ा आतडय़ास जास्त उपयुक्त घटक मिळतात. स्त्रियांच्या धुपणी विकारात तांदुळजाचा रस व तांदुळजाचे धुवण व मध असे मिश्रण फार त्वरित गुण देते. अनेक प्रकारचे विषविकार, चुकीच्या औषधांनी शरीराची आग होत असल्यास तांदुळजाचा रस प्यावा. लघवी स्वच्छ होऊन शरीर निदरेष होते. उंदीर, विंचू, पारा व इतर धातूंच्या विषारात याचा रस प्यावा. शरीराला आवश्यक सर्व घटक तांदुळजा भाजीत आहेत.
पालक
पालक ही अतिशय आरोग्यदायी पालेभाजी आहे. कोवळा पालक औषधी गुणांचा आहे. पालक शिजवताना पाणी थोडेच घ्यावे. पालक भाजीत लोह व काही प्रमाणात नैसर्गिक ताम्र असल्याने पांडू विकारावर अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर हाडे बळकट करणारे क्षार पालकभाजीत आहेत. त्याकरिता हाडे ठिसूळ झाली असल्यास पालकभाजी खावी. हाडे जुळून यावी, लवकर ताकद यावी याकरिता शस्त्रकर्म झाल्यावर पालक भाजी किंवा त्याचा रस यांचा मुक्त वापर करावा. पालकाच्या हिरव्या पानात जीवनशक्ती आहे. कृश मुलांना अवश्य द्यावी. दुधाचा पर्याय म्हणून पालक भाजी वापरावी. त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारून रक्त व अस्थी या दोनही धातूंची वाढ व्हायला मदत होते. पालक भाजीमुळे पोटात होणारा मुरडा थांबतो. वारंवार जुलाब होत असल्यास थांबतात. मात्र पालकभाजी स्वच्छ धुऊन घ्यावयास हवी. फुप्फुसातील दूषित वायू हटविण्यास उपयोगी आहे. काहींच्या मते पालकाच्या भाजीमुळे मूतखडा विरघळून जातो.
पुनर्नवा
पुनर्नवा, घेटोळी, वसू या नावाने ओळखली जाणारी भाजी दर पावसाळ्यात नव्याने येते. याची पालेभाजी कावीळ, उदर, जलोदर, पोट मोठे होणे, लिव्हर सिरॅसिस, पांथरी वाढणे या विकारात फार उपयुक्त आहे. पोटात पाणी झाले असताना अन्न खाल्ले की पोट फुगते. अशा वेळी पुनर्नव्याच्या पानांच्या भाजीत भात शिजवून द्यावा. पाणी होणे थांबते. पोटाची सूज कमी होते. पुनर्नव्याच्या पानांचा व मुळांचा रस काढून प्यावा. लघवी साफ होऊन शरीराची सूज ओसरते. पुनर्नव्याच्या पाल्याच्या रसाने रक्त वाढते.
माठ
माठ ही सदासर्वदा उपलब्ध असणारी पालेभाजी रानोमाळ आपोआपही उगवते व त्याची बागायती शेतीही केली जाते. रानोमाळचा माठ बहुधा काटेरी असतो. एरवी तांबडा व पांढऱ्या रंगाचा माठ मिळतो. माठाची पालेभाजी ही पथ्यकर, वजन वाढवायला व अम्लपित्त विकारांत विशेष उपयोगी आहे. मूतखडय़ाची तक्रार असणाऱ्यांनी माठाचा वापर टाळलेला बरा. तांबडा माठ हा गुणांनी श्रेष्ठ आहे. रक्तवर्धक म्हणून माठाची पालेभाजी जरूर वापरावी.
मुळा
कच्चा मुळा, पक्का मुळा, वाळलेला मुळा व डिंगऱ्या किंवा त्याच्या शेंगा असे मुळ्याचे चार प्रकार वापरात आहेत. कच्चा मुळा जास्त औषधी आहे. मलमूत्रप्रवृत्ती साफ करतो. दीपक, पाचक, त्रिदोषहारक आहे. मूतखडा विकारात मुळ्याच्या पाल्याचा रस दीर्घकाळ घ्यावा. मूतखडा विरघळतो किंवा त्याचे बारीक बारीक कण होतात. पांथरी वाढली असता कोवळा मुळा भरपूर खावा. मुळा तापामध्ये पथ्यकर आहे. त्यामुळे अग्निमांद्य दूर होऊन तापाचे कारण नाहीसे होते. कोवळ्या मुळ्यांच्या पानांचा जास्त औषधी उपयोग होतो. पक्व मुळा हा रूक्ष, उष्ण, पचायला जड व शारीरिक कष्ट करण्याकरिता उपयुक्त आहे. मूळव्याध, पोटातील कृमी, पक्वाशयात वायू धरणे, याकरिता पोसलेला मुळा मीठ लावून खावा. अजीर्ण, अपचन दूर होते. सुकलेला मुळा पचावयास हलका व कफ वात विकारात उपयुक्त आहे. वाळलेल्या मुळ्याचे चूर्ण विषावर उत्तम उतारा आहे. डिंगरी किंवा मुळ्याच्या शेंगा वातनाशक, गुणाने उष्ण पण उत्तम पाचक आहेत. मुळ्याचे बी लघवी व शौचास व्यवस्थित होण्याकरिता उपयुक्त आहे. मूतखडा मोडण्याकरिता मुळ्याच्या बियांचे चूर्ण खावे.
डिंगऱ्या
जून मुळ्याच्या शेंगा औषधी गुणाच्या आहेत. डिंगऱ्या मलावष्टंभक, तीक्ष्ण व गुरू गुणाच्या आहेत. बियांचा लेप गंडमाळा, दडस गावी, अर्बुद, शिबे या विकारात बाह्येपचारार्थ उपयुक्त आहे. मूतखडा, कष्टसाध्य गाठी, जुनाट सूज या विकारात डिंगऱ्यांची भाजीने फरक पडतो.
मेथी
मेथी हे मधुमेहींना वरदान आहेच. चवीच्या दृष्टीने पालेभाज्यांत मेथीचे महत्त्व फार मोठे आहे. मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेत मेथीची भाजी नियमित खाल्ली तर मेथीपूड मिसळून गव्हाची पोळी खाण्याची पाळी येत नाही. मेथीची पालेभाजी खाल्ल्यामुळे लघवीचा वर्ण सुधारतो. भूक सुधारते, पाचक स्राव वाढतात. बाह्येपचार म्हणून मेथी पालेभाजीचा लेप दुखणाऱ्या सांध्यावर करावा. दु:ख कमी होते. केस गळणे, कोंडा, केस निर्जीव होणे याकरिता मेथीच्या रसाने केस धुवावे.
राजगिरा
राजगिरा बियांचा वापर आहेच. राजगिरा पालेभाजी रक्तशुद्धीकरिता फार उपयुक्त आहे. गंडमाळा, क्षय, लघवीची जळजळ या विकारांत पालेभाजी किंवा त्या पानांचा वाटून लेप करावा. शरीरस्वास्थाकरिता लागणारी द्रव्ये राजगिरा पाने व बिया या दोन्हीही आहेत.
शतावरी
शतावरी पाने अगदी बारीक असतात. लहान मुलांच्या जुलाब, पित्त होणे, दातांचा त्रास या विकारांत रस द्यावा. पाने पौष्टिक आहेत. कंदातील स्तन्यजनन हे गुण पानात अल्प प्रमाणात आहेत. कुंडीत शतावरी शोभेकरिता लावतात. त्यातील पानांचा ताजा रस ताकद कमावण्याकरिता उपयुक्त आहे. गोवर, कांजिण्या, जीर्णज्वर, कडकी या विकारांत ही पालेभाजी पथ्यकर आहे.
शेपू
उग्र वासामुळे शेपूचा वापर कमी होतो. शेपूची पालेभाजी वात व कफविकारात फार चांगली. पाने स्वच्छ धुऊन घेतली की उग्र वास कमी होतो. अग्निमांद्य, पोटफुगी, गॅस, कुपचन या विकारांत लगेच गुण देणारी ही पालेभाजी आहे. सोबत जिरे, आले किंवा लसूण वापरावा. लहान मुलांच्या पोटदुखी, जंत, कृमी या तक्रारीवर एकवेळी दिलेली भाजी काम करते. ज्या स्त्रियांना मासिक स्राव व्यवस्थित येत नसल्यास त्यांनी काही दिवस शेपूची पालेभाजी खावी. विटाळ नियमित होतो. गळवे पिकण्याकरिता पानांचा लेप करावा. गंडमाळा विकारात पोटात घेण्याकरिता व बाहेरून पानांचा लेप अशा दोन्हीकरिता शेपूच्या पानांचा वापर करावा.
हादगा
हादग्याची फुले पांढरी किंवा जांभळ्या रंगाची असतात. चणापीठ पेरून हादग्याच्या फुलांची कोरडी भाजी फार चविष्ट होते. पूर्वी मिळणाऱ्या अनेक भाज्या अलीकडे दिसेनाशा झाल्या आहेत. हादग्याला आगस्ता असे संस्कृत नाव आहे. आयुर्वेदीय औषधीकरणात मनशीळ शुद्धीकरिता हादग्याच्या पानांच्या रसाचा वापर सांगितला आहे. ठेचाळलेल्या भागावर किंवा जखमेवर पाने ठेचून बांधावी. जखम भरून येते.
संकलक : प्रमोद तांबे